छगन भुजबळांचा ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यास खुला विरोध:तेली, माळींचे नेते म्हणून घरे जाळल्याचा आरोप
बीडमध्ये झालेल्या हिंसाचारात ओबीसी नेत्यांच्या घरांवर टारगेटे केले गेले, असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला. मराठा समाजाच्या आरक्षणाला मी व माझ्या संघटनेकडून कधीही विरोध केला गेला नाही. तर ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण दिले जाऊ नये, अशी माझी भूमिका आहे आणि मी त्यावर ठाम आहे. तर बीडमधील जाळपोळीच्या घटनांमध्ये जर जरांगे यांचे लोक नाहीत तर मग त्यांनी गुन्हे मागे घेण्याची मागणी का करावी, असा सवाल उपस्थित करत मंत्री भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्ला केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज मराठा आंदोलनावेळी जाळपोळ झालेल्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी नेतेमंडळींच्या घरे आणि कार्यालयांची जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांवर सडकून टीका केली. तसेच विविध मुद्द्यांना हात घातला.
तेली, माळी समाजाचे नेते म्हणून घरं जाळली?
तेली आणि माळी समाजाचे नेते आहेत, ओबीसी समाजाचे नेते आहेत त्यामुळे तुम्ही त्यांचे घरे आणि कार्यालये जाळली का? असा थेट सवाल छगन भुजबळ यांनी केला. यावेळी भुजबळांनी पोलिसांवरही प्रश्न उपस्थित केले. पोलिसांनी आंदोलकांचा प्रतिकार का केला नाही? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
माजी आमदार जयदत्त क्षीरसागर आणि विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरी लहान मुलांना अक्षरश: उंच असलेल्या भींती वरुन पलिकडच्या मुलांनी वाचवलं. मुस्लिम समाजाच्या आणि इतर समाजाच्या लोकांनी त्या भींतीवरुन लहान मुलांना ओढून घेतलं आहे. म्हणजे या आगीत ते सापडले असते तर ती मुलं वाचली नसती. आग कशासाठी लावण्यात आली होती?, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.
पूर्व नियोजीत करून उद्रेक झाला
हे इतकं प्लॅनिंगने होतं की, माजलगावची टीम वेगळी आणि इथे नासधूस करणारी टीम वेगळी होती. प्रत्येकाला नंबर दिला होता. 1 नंबर झाला, 15 नंबर, 15 नंबर झाला, मग 22 नंबर, प्रत्येक ठिकाणी सांकेतिक नावं देण्यात आली होती. या सगळ्या प्लॅनने नासधूस करण्यासाठी सांकेतिक नावं देण्यात आली. ठरवून उद्रेक झाला. या घटनांमध्ये कमीत कमी जवळपास 700 ते 800 लोकांचा समावेश होता, असा दावा छगन भुजबळांनी केला.
फक्त ओबीसींचे म्हणून त्यांचे घरे जाळायचे
फक्त ओबीसींचे कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांचे घरे जाळायची. जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे तर काहीच म्हणाले नव्हते. त्यांच्या घरी, ऑफिसमध्ये, शिक्षण संस्थेत कशाला जाळपोळ केली? तेली समाजाचे आहेत म्हणून? ओबीसींचे आहेत म्हणून? कशासाठी? माळी समाजाचा आहे म्हणून? प्रकाश सोळंके काय म्हणाले होते?, असे अनेक सवाल छगन भुजबळांनी केले.
शंभर टक्के लोकांना फायदा होत नाही
आरक्षणाने सर्व विषय सुटत नसतात. हे खरंय. आरक्षण संघटनात्मक पद्धतीने आज 75 वर्षांपासून दलित समाजाला आहे. त्यातून एसपी झाले, कलेक्टर झाले. पण आजसुद्धा झोपडपट्ट्यांमध्ये दलित समाजच वावरतोय. गरीबी दूर झालेली नाही. काही टक्के लोकांना जरुर त्याचा फायदा मिळतोय. समाजात जो खालचा वर्ग आहे तो इतरांसोबत आणण्याचा हा कार्यक्रम आहे. हा गरीबी हटवण्याचा कार्यक्रमच नाही. दोन-तीन टक्क्याचा फायदा होतो. आरक्षण दिलं तरी सर्वच शंभर टक्के लोकांना फायदा होत नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.
70 महिला-पुरुष पोलिस जखमी
मोठमोठे हत्यारं घेऊन घरे जाळली. या सगळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. पोलीस हतबल का झाली? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एवढं सगळं पोलिसांना माहिती नव्हतं. पोलिसांनी काहीतरी प्रतिकार करायला हवा होता. पण कुठेही प्रतिकार केला नाही. याचं कारण ते पहिल्या दिवशी ज्यावेळेला उपोषणाला बसले होते, तिथे पोलिसांनी लाठीमार केला ती बाजू जनतेच्या समोर प्रकर्षाने समोर आली. पण आज तिथल्या एसपींचं स्टेटमेंट आलंय. त्यांनी सांगितलंय की, आमचे 70 महिला-पुरुष पोलीस जखमी झाले आहेत. एवढे पोलीस जखमी झाल्यानंतरही पोलीस प्रतिकार करत नाहीत, असे छगन भुजबळ म्हणाले.
पोलिसांवर हल्ला झाला हे लक्षात घेतले पाहिजे
एवढं झाल्यानंतर सरकारने काही लोकांच्या बदल्या केल्या. एवढंच नाही, गुन्हे मागे घ्यायला सांगितलं तर मागे घ्यायला सांगितलं. अशा रितीने पोलिसांना ट्रिटमेंट मिळत असेल, कारवाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होते, त्यामुळे पोलिसांनी करायचं म्हणून करा, असं केलं असेल. गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे फेल ठरली आहे. पोलिस गेल्यानंतर अगोदर मारतील एवढं महाराष्ट्र पोलिस निर्दयी नाहीत. त्यांच्यावर हल्ला झाला हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे. याची चौकशी कोण करणार? याची कडक चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भुजबळांनी केली.
एवढं झाल्यानंतर सरकारने काही लोकांच्या बदल्या केल्या. एवढंच नाही, गुन्हे मागे घ्यायला सांगितलं तर मागे घ्यायला सांगितलं. अशा रितीने पोलिसांना ट्रिटमेंट मिळत असेल, कारवाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होते, त्यामुळे पोलिसांनी करायचं म्हणून करा, असं केलं असेल. गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे फेल ठरली, असे छगन भुजबळ म्हणाले.
पवार साहेबांपासून सर्वांनी जी भूमिका मांडली
आम्ही मराठा समाजाच्या विरोधात बोललो नाही जी भूमिका पवार साहेबांपासून सर्वांनी मांडली तीच भूमिका आमची आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण द्या. बीड मध्ये हल्ला करण्यात आला त्याचे गुन्हे मागे घेण्याची भाषा आज केली जात आहे मात्र त्यावेळी पोलीस हतबल का होते याचे उत्तर अजुनही मिळाले नाही. जालना मध्ये पोलिसांवर देखील हल्ला झाला होता. महाराष्ट्रातील पोलीस उगीच लाठीचार्ज करत नाही. ७० पोलीस जखमी झाले असे स्वतः येथील पोलीस अधीक्षक दोषी यांनी माध्यमांना सांगितले होते. त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. मात्र त्यांचे गुन्हे मागे घेतले जात आहे त्यामुळे पोलिसांचे मनोबल खचले जाऊ शकते. असे मत देखील मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.
..तर ओबीसी गप्प बसणार नाहीत
ते म्हणाले की, आरक्षणाच्या प्रश्नावर कुणी मतांच राजकारण करत असेल तर ओबीसी समाज देखील गप्प बसणार नाही तेही आपली निर्णायक भूमिका पार पाडतील. आरक्षणाचा प्रश्न कायमचा सोडवायचा असेल, सर्व समाजाला त्यांचं न्याय हक्क अबाधित ठेवायचे असतील तर जातनिहाय जनगणना करण्यात यावी. त्यातून सर्व समाजाची आकडेवारी समोर येऊन आरक्षणाचा लाभ देता येईल अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली
About The Author

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.
Comment List